Posts

आनंदाची गुढी

 आनंदाची गुढी        फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो.       गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असे म्हटले जा

शिक्षक

Image
शिक्षक 5 सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचा जन्मदिवस, जो भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या डॉ. राधाकृष्णन ह्यांच्यामुळे शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखीत झाले ते स्वतः एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. एक सर्वज्ञ, ज्ञानी, प्रकांड पंडित, जवळपास 14 विविध भाषा फक्त अवगतच नव्हत्या तर त्या भाषेंवर प्रभुत्व होते. डॉ. राधाकृष्णन यांनी 1962 साली राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेण्याआधी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे 'उत्कृष्ट शिक्षक' होते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतात. शिक्षक हा काही फक्त एक पेशा नाही अथवा उत्पन्नाचे साधन म्हणून स्वीकारलेली नोकरी होऊ शकत नाही. शिक्षक होण्यासाठी त्या पेशाची उपजत आवड हवी. विद्यार्थी आणि शिक्षण ह्यातील तो महत्वाचा दुवा आहे. शिक्षक होण्यासाठी एक तळमळ असावी लागते, कुठल्याही स्तरांवर शिकवण्यासाठी एक शिकवण्याची तळमळ हवी. समोरच्या विद्यार्थ्याला शिकवताना त्याला त्या विषयात पारंगत करण्याच्या ध्यासासोबत एक सुजाण नागरिक बनवण्याची भावना जोपासली जाते. पूर्वी शिक्षक स्वतः

ये राखी बंधन हैं ऐसा...

Image
ये राखी बंधन हैं ऐसा... मंडळी, सध्या online चा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट online मागवता येते. आज नवीन वाटणाऱ्या गोष्टी उद्या जुन्या होतात. पण काही गोष्टी या चिरंतन टिकून राहतील त्यातीलच एक म्हणजे रक्षाबंधनाची परंपरा. अगदी बारीकसारीक गोष्टीही ऑनलाईन मागवणारी मंडळी आहेत. तशीच ते राखीही ऑनलाईन मागवू शकतील. पण त्यामागील बहिणीचे प्रेम नाही मागवता येणार. ‘ ये राखी बंधन है ऐसा...’ राखी म्हणजे तसा दिसायला एक रेशमी धागा. पण त्यामागची भावना किती श्रेष्ठ ! राखी म्हणजे रक्षण. राखीचा पवित्र धागा अशा काही बंधनात बांधतो की हे बंधन दिसत नाही. राखी भलेही तुटेल पण त्यामागची भावना, प्रेम अबाधित राहते. एक अदृश्य बंधन भावाबहिणींना बांधून ठेवते.      वर्षाच्या ३६५ दिवसातले ३६३ दिवस तुमचे पण दोन दिवस बहिणीचे. एक राखी पौर्णिमा आणि दुसरा भाऊबीज. भाऊ आणि बहिण यांचे नाते सगळ्या सीमारेषा पार करून जाते. जाती, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांना ओलांडून ते जाणारे आहे. विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हा सण आहे. बहिण आपल्या संसारात रमलेली असते. तिचे एक नवीन विश्व तयार झालेले असते. त्या विश्वात ती वर्षभर गर्क असते. मुलेबाळे, स

सारे जहाँ से अच्छा...

 *सारे जहाँ से अच्छा...* आपल्या साऱ्यांचे हे भाग्य आहे की, या भारतभूमीत आपला जन्म झाला. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या जलाने पावन झालेला हा प्रदेश हिमालयाचा रुपेरी मुकुट या भारतमातेने परिधान केला आहे. सागर तिच्या पायाला स्पर्श करतो आहे. कन्याकुमारी येथे तिन्ही सागरांचं जल एकमेकांत मिसळलेले आपणास दिसतं. त्या समुद्रात जो खडक आहे. ज्यावर स्वामी विवेकानंद बसले होते, त्या खडकावर सागराच्या लाटा सतत येऊन अभिषेक करीत असतात. जणू सागराचीही देशभक्ती उचंबळून येते आणि लाटांच्या रूपात तो भारतमातेला जलाभिषेक करतो. तिथूनच स्वामी विवेकानंदांना प्रेरणा मिळाली. आपलं जीवनध्येय गवसलं. सागराची हाक आणि रामकृष्ण कापरमहंसांचे आशीर्वाद यांचा संगम झाला आणि नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांत झालं. भारतीय संस्कृती जगाला कळली, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने. याच विवेकानंदांनी 'देश हाच आपला देव आहे. त्याचीच पूजा करा असा प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला. इंग्लंडमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हृदय मातृभूमीच्या आठवणीनं उचंबळून आलं. सागराच्या सान्निध्यात बसले असताना त्यांच्या ओठी शब्द आले,

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

Image
  शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण श्री त्रिविक्रम देव , त्रिभुवनाची जननी | तो हा चक्रपाणी शेंदुर्णीत || सोन नदीच्या काठावर सुंदर पवित्र मंगल असे शेंदुर्णी गांव वसलेले आहे. त्रिविक्रम महाराजांच्या या प्रति पंढरपूरात अनेक साधु संत कडोबा महाराजांसारखे होऊन गेलेत. त्याचप्रमाणे सहकार महर्षी आप्पासाहेब रघुनाथराव गरूड व काका साहेब साने यासारखी सर्व क्षेत्रातील श्रेष्ठ मंडळी होऊन गेलीत. याच पुण्यकर्म भूमीमध्ये आचार्य बापूसो.   गजाननराव गरुडांचा   जन्म ३ ऑक्टोंबर १९२९ साली    आचार्य बापूसो. गजाननराव गरुड   जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावी झाला. त्यांनी आपल्या स्वतःच्या अलौकीक कर्तृत्वाने महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबडेकर व राजर्षी शाहू महाराज , विठठ्ल रामजी शिंदे , सावित्रीबाई फुले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचा प्रयत्न केला . बापूचे वडील स्व. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड हे जळगांव जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले प्रेसिडेंट होते व सलग १५ वर्षे अध्यक्ष असलेले व शेंदुर्णी को ऑप फ्रुटसेल  सोसा. चे आजन्म अध्यक्ष अस

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

 ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा         मुळात पौर्णिमा हा शब्दच किती सुंदर..! पौर्णिमा म्हटलं की आकाशात रात्री तेजानं प्रकाशमान होणारं पूर्ण चंद्रबिंब आपल्यासमोर येतं . त्या प्रकाशात मनाला शांतता देणारी एक प्रकारची शीतलता असते. ' चंद्र व्हा हो पांडुरंगा , मन करा थोर, पौर्णिमेच्या चांदण्याला भुकेला चकोर...' जसा चंद्राच्या चांदण्याला चकोर भुकेला असतो, तसाच सद्गुरूंच्या कृपेसाठी शिष्यही भुकेला असतो. सद्गुरू मग आपल्या शिष्याला ज्ञानामृत पाजण्यासाठी चंद्र होतात. पांडुरंग तर ते प्रत्यक्ष असतातच. आपल्या संस्कृतीत गुरूंना देव म्हणण्याची पद्धत आहे. नुसते ' गुरु ' न म्हणता आपण आदराने त्यांना गुरुदेव म्हणतो, आचार्यदेव म्हणतो. एवढा गुरूचा महिमा आहे. संत कबीर तर गुरूंना देवापेक्षाही महान मानतात. ते म्हणतात गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी, जो गोविंद दिजो बताय. एकाच वेळेला समोर सद्गुरू आणि परमेश्वर असे दोघेही उभे राहिले, तर मी आधी सद्गुरुंच्या पायी लागेन. कारण परमेश्वराचे दर्शन घडवणारे सद्गुरू आहेत. असे म्हणतात की एखादया वेळी देव कोपला तर सद्गुरू सांभाळून घेतात